आता मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासांत: गडकरी

नवी दिल्ली : २५ जुलै – केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते दिल्ली महामार्ग जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते थेट मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काम समोर येणाऱ्या अनेक अडचणींवर मार्ग काढून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
२०२० – २१ मध्ये ३६.५ किलोमीटर प्रति दिवस गतीने एक्सप्रेस निर्माणाचे काम पूर्ण करण्यात आले. आत्तापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांपैकी हे काम रेकॉर्डब्रेक गतीने झाल्याचे गडकरींनी सांगितले. कामाची हीच गती कायम राहिली तर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम वेळेच्या अगोदरच पूर्ण होऊ शकेल, असेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply