पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र होणार अनलॉक

मुंबई : १३ जुलै – महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध आता पुढील आठवड्यांपासून टप्प्याटप्प्याने हटवून राज्य सरकार अनलॉक करण्यास सुरूवात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्र अनलॉक करण्यासाठी राज्य सरकार ओपनिंग अप हा मंत्र अवलंबणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी राज्य आपतकालिन विभागातील अधिकार्यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टाक्स फोर्समधील तज्ञ डाँक्टर आणि वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता. त्या अहवालानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बंध टप्या टप्याने कमी करून राज्य “ओपनिंग अप” कडे नेण्याचा निर्णय घेत आहेत. पाहूयात कशा प्रकारे हे नियोजन आहे.
या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होवून टप्याटप्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल. टप्याटप्याने सर्व आस्थापना सुरू करण्याचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच लसीकरण झालेल्यांना दुकाने, हॉटेलमधील उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यामध्ये रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार असून, 50 टक्केची मर्यादाही काही प्रमाणात शिथिल केली जाण्याची शक्यता. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचा-यांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंट प्रवेशात प्राधान्य देण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं बंदिस्तऐवजी मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था हॉटेल्सना करण्याच्या सूचना दिल्या जातील.
सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असून दुकानांमधील सर्व कर्मचा-याचे लसीकरण झालेले आवश्यक आहे.

Leave a Reply