देवेंद्र फडणवीस बदलले आहेत – संजय राऊत यांचा टोला

नागपूर : २७ डिसेंबर – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना अधिवेशनात भ्रष्टाचार विरोधात लढले, आणि आता सत्तेत असताना आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहे, त्यांना हा लवंगी बॉम्ब वाटतो, देवेंद्र फडणवीस बदलले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना लगावला.
देवेद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराविरोधात लढले. पण ते आता भ्रष्टाचाराविरोधात लढत नाहीत. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे वाती तयार आहेत. सीमा प्रश्नावरचा ठराव हा अत्यंत महत्वाचा आहे. सीमा प्रश्नाचा ठराव वाहून जाऊ नये, आणि सरकारला कारण मिळू नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, सरकार ने केलेला ठराव हा अत्यंत बुळचट आहे, असंही खास संजय राऊत म्हणाले.
हिवाळी अधिवेशात विरोधकांनी जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे. खासदार संजय राऊतही नागपूरमध्ये उपस्थित आहेत. आज राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली
36 एकर जमीन यांनी अशीच वाटली आहे, कोट्या वधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विधानसभेत रोज लोकशाहीची हत्या होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष पक्षपाती आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी लगावला.
हिवाळी अधिवेशात विरोधकांनी जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे. खासदार संजय राऊतही नागपूरमध्ये उपस्थित आहेत. आज राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना अधिवेशनात भ्रष्टाचार विरोधात लढले, आणि आता सत्तेत असताना आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहे, त्यांना हा लवंगी बॉम्ब वाटतो, देवेंद्र फडणवीस बदलले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला

Leave a Reply