कर्ज फेडण्याच्या विवंचनेत शेतकऱ्याने विष प्राशन करून केली आत्महत्या

यवतमाळ : २ ऑगस्ट – ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामनगर(रुई) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली. वसंत ब्रम्हा जाधव (वय 50 )असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी यावर्षी शेतात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले. त्यामुळे बँक आणि सावकारी यांच्याकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, ही विवंचना त्यांना सतावत होती. त्यातच ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जात वाढ होत होती. अशातच वसंत जाधव यांनी पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
मृत शेतकऱ्यावर अलाहाबाद बँक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि खासगी सावकारी कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply