महाविकास आघाडीत मतभेदाच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत – जयंत पाटील

मुंबई : १० जून – राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अफवा पसरून परिवर्तन होईल असे भाजपला वाटत आहे. मात्र आमच्या चारही जागा निवडून येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. विधिमंडळात हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
विधानसभेतून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला. महाविकास आघाडीने चर्चा करून निर्यण घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत. जेणेकरून मत परिवर्तन होईल, असे भाजपला वाटत आहे. मात्र, त्यांचा हा भ्रम असून महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. आमचा विजय नक्की होणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देताना ते म्हणाले, प्रत्येकजण मत व्यक्त करत असतो असे, सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला.

Leave a Reply