नागपुरात मनरेगा कार्यालयाला लागली आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक

नागपूर : २ मे – येथील प्रशासकीय भवन क्रमांक 2 च्या पहिला माळ्यावर असलेल्या मनरेगाच्या कार्यालयाला आग लागली आहे. आज सकाळी लागलेल्या आगीवर अग्नीशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरीही मनरेगाचे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. याचबरोबर आगीत सर्व कागदपत्रे जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीतून मनरेगाच्या ३४ जिल्ह्यांचा कारभार चालतो.

Leave a Reply