बाळासाहेबांचे मतांचे राजकारण होते – प्रकाश आंबेडकर

मुंबई : १६ जानेवारी – “बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. उद्धव ठाकरे यांनी माझ्या आजोबांचे हिंदूत्व मी घोतोय, असे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरु झाली. बाळासाहेबांचे मताचे राजकारण होते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
जागा वाटपावेळी तुम्ही काँग्रेससोबत ताठर भूमिका घेता असा आरोप आहे. त्यावरही आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गरीब मराठ्यांसाठी तिकीट मागू नका. ओबीसींसाठी तिकीट मागू नका. तुम्ही फक्त दलितांसाठी तिकीट मागा, असं म्हटलं तर मग ही ताठर भूमिका झाली का?
गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ज्या 12 जागा तुम्ही सातत्याने पराभूत होत आला आहात. आताही पराभूत झाला आहात, त्या आम्हाला द्या, अशी मागणी आम्ही केली. त्यात ताठर भूमिका काय आली? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा असू शकतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी भाजपकडून निवडणुकीत खेळी खेळली जात आहे. तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरात देखील प्रयत्नशील असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानावरही त्यांनी भाष्य केलं. मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. तारीखही मागितली आहे. पाच लाख लोकं बोलावून त्यांचा सत्कार करेन. याचं कारण म्हणजे ते सत्य बोलले. कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या, मग त्या भीकेतून का असेना हे त्यांना सांगितलं.
तसेच उरलेल्यांनी संस्था खोक्याच्या संस्कृतीतून उभ्या केल्या, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं हे का विसरता? असा सवाल आंबेडकर यांनी केला. तसेच मंत्रिपद टिकवायचंय, भाजपमध्ये राहायचं आहे. तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्य मांडलंय ते सर्वात महत्त्वाचं आहे. असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.

Leave a Reply