आता पुन्हा चौकशी का ? – दिशा सालियनच्या कुटुंबीयांचा सवाल

मुंबई : २३ डिसेंबर – नागपूर सुधार प्रन्यासमधील ( एनआयटी ) भूखंड नियमीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेल्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपातील आमदारांनी दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. या मागणीनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत करून शिवसेनेला ( ठाकरे गट ) शह देण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एसआयटी चौकशीने आमची मुलगी परत येईल का? हे सगळ का करण्यात येत आहे? दिशाची केस मुंबई पोलिसांनी आधीच बंद केली आहे. याबाबत बरीच चौकशी झाली असताना आता पुन्हा का चौकशी? आम्ही शांततेत जगत आहोत. आम्हाला काहीही नको आहे. आता आम्हाला कशातही अडकायचं नाही आहे,” असं दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

Leave a Reply