झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

नागपूर : २२ डिसेंबर – दोन अपत्य असलेली महिला युवकाच्या प्रेमात पडली. दोन महिन्यापांसून ती बेपत्ता होती. अखेर या प्रेमवीरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी गडमंदिर रामटेक अंबाळा परिसरातील वनभागात दोघांचे देह लटकलेल्या अवस्थेत आढळले.
मयूर गजानन माणूसमारे (वय ३०) आणि माया (३३, काल्पनिक नाव) यांचे एकमेकांवर प्रेम जडले. हे दोघेही हिंगणा तालुक्यातील रहिवासी होते. मायाचा विवाह झाला असून तिला दोन अपत्ये आहेत तर मयूर हा अविवाहित होता. कांचन पतीच्या घरून गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समजले. परंतु, कदाचित प्रेमभंग किंवा पश्चातापामुळे तिची पतीकडे परत जाण्याची इच्छा झाली.
यासंदर्भात तिचे पतीशी बोलणेही झाले होते. मुलांच्या प्रेमामुळे तीने परत येण्याबाबत पतीशी बोलणे झाले होते, अशी माहिती मायाच्या पतीने दिली. परंतु, या दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक प्रमोद मक्केश्वर यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे, कॉंस्टेबल शेषराज उके पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply