कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे : आदित्य ठाकरे

नागपूर : २० डिसेंबर – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे अशी टीका केली. विद्यमान सरकार केवळ 40 गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, असेदेखील ते म्हणाले.
सीमावादावर राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री या मुद्यावर आक्रमक असताना दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायलादेखील तयार नाही, असे पहिल्यांदाच होत आहे. जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटायला हवा तो रस्त्यावर मांडण्यात येत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply