सततच्या वादाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

गोंदिया : ३ नोव्हेंबर – आत्महत्येच्या कित्येक घटना दररोज समोर येत असतात. मात्र, यातील अनेक घटनांमध्ये आत्महत्येची कारणं ही हादरवून सोडणारी असतात. अतिशय क्षुल्लक कारणावरुन अनेकदा लोक टोकाचं पाऊल उचलतात. तर अनेकदा हे पाऊल उचलण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं. गोंदियामधून नुकतंच आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेत 41 वर्षीय विवाहितेनं विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या दवनीवाडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खडबंदा गावात घडली आहे. आशाबाई सुनील कापसेकर वय 41 वर्ष असं महिलेचं नाव आहे. त्या खडबंदा येथील रहिवासी होत्या. लग्नाला 20 वर्ष झालेली मात्र तरी मृतक महिलेला अपत्य नसल्याने मृतक महिलेचा तिच्या पतिसोबात सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्रीसुद्धा याच कारणाने दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की आशाबाई यांनी संतापाच्या भरात घरालगत असलेल्या शेतशिवारातील विहिरित उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला दिसला. यानंतर संबंधित घटना उघड झाली आहे. याप्रकरणी दवनिवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply