सर्वोच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दिलासा

नवी दिल्ली : ११ ऑक्टोबर – मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजून केल्यानंतर ईडीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अनिल देशमुखांसाठी हा मोठा दिलासा आहे.
अनिल देशमुख हे कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत होते. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला होता.

Leave a Reply