वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झाला नव्हता – उदय सामंत

मुंबई : १५ सप्टेंबर – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंज्यस करार झाला नव्हता. केवळ चर्चा झाली होती असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. पॅकेज वेळेत दिलं असतं तर हे झालचं नसते असेही सामंत म्हणाले. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. दरम्यान, संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे. दरम्यान, आज या सर्व प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला हे मला कालच समजल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उ्दयोग विभाग ऐकमेकांशी संलग्न असणे गरजेचे असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. यासंबंधी आम्ही धोरण तयार करत असल्याचे सामंत म्हणाले. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये देखील टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नसल्याची घोषणा देखील यावेळी उदय सामंत यांनी केली. रिफायनरीबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले. आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. रिफायनरी प्रकल्पामुळं मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. मोठे प्रकल्प आणायचे असल्यास राजकारण बाजूला ठेवणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सामंतांनी यावेळी सांगितले. राजकारण करम्यापेक्षा सांघिक अभ्यास करावा असेही सामंत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचे उद्योग वाढणार असतील तर सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यास मी तयार आहे. पण या नेत्यांना बोलावण्याची विनंती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करमार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून मला जे काही करता येईल ते मी करणार आहे. उद्योग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्योगासंदर्भात चांगली धोरण राबवण्यासाठी मी विविध ठिकाणी जाऊन माहिती घेऊल. तेथील मंत्र्यांच्या भेटी घेून चर्चा करेल अशी माहिती देखील सामंत यांनी दिली. तरुणांच्या रोजगारात कोणाही अडचणी आणू नये असेही ते म्हणाले.

Leave a Reply