गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

भंडारा : १ सप्टेंबर – गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथे घडली आहे. अंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नदी नाले तुटुंब भरू वाहत आहे, अशातच भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये दोन जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नईम खान लाल खान (22) आणि अमिन शहा लाल शहा (22) दोघे रा. अब्बुमियानगर, भांडेवाडी, नागपूर अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला.
मुळचे मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी असून गत काही दिवसांपासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात राहत होते. गावोगावी जाऊन कपडे विक्री करत असे. दरम्यान चौघेजण एका व्हॅनने पवनी इथं कापड विक्रीसाठी आले होते. निलज मार्गावरील गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि आंघोळीचा बेत आखला. आंघोळीसाठी नईम खान आणि अमिन खान उतरले. मात्र पाण्यात उतरल्यानंतर अंदाज न आल्यामुळे एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला, मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने दोघेही वाहून गेले.

Leave a Reply