एनडीए म्हणजे नो डेटा अव्हेलेबल – राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : २४ जुलै – राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए) म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी टीका केली. या सरकारकडे कोणतीही माहिती नाही, कोणतेही उत्तर नाही आणि कोणालाही हे सरकार जबाबदार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
ऑक्सिजनअभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे आपण मानावे. शेतकरी आंदोलनात कोणाचाही मृत्यू झाला नाही, पायी प्रवास करताना मजूराचा मृत्यू झाला नाही, हिंसक जमावाने कोणाची हत्या केली नाही आणि कोणत्याही पत्रकाराला अटक केली नाही, असेही या सरकारला वाटते, असे ट्वीट राहुल यांनी केले आहे.

Leave a Reply