शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

गडचिरोली : २९ जून – गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून आज(बुधवार) सकाळी पेरणीसाठी शेतात गेलेल्या आणखी एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला.
सागर आबाजी वाघरे (४८), असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावातील सागर वाघरे आज सकाळी शेतात पेरणीसाठी गेले होते. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Leave a Reply