मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

ब्लॉक अन् अनब्लॉक

एक उदाहरण सांगते, फेसबुक म्हणा व्हॉटसअप म्हणा, एखाद्या व्यक्तीचा त्रास वाटू लागला किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलणे टाळायचे असेल तर एक सुविधा आहे त्या व्यक्तीला ब्लॉक करणे. मग त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी तो बोलू शकत नाही ना मॅसेज करू शकत. किती सोपं आहे हे. पण Block किती छोटा शब्द आहे. अडीच अक्षरी आणि इंग्रजीत चार अक्षरी पण, या छोट्याशा शब्दाने संवादच संपून जातो. काही काळापुरता नाहीतर कायमचा. किती सोपं झालंय आजकाल आपल्याला नकोसं असणारं कोणी ब्लॉक मध्ये टाकलं जातं नाहीतर आपण कोणाला नकोसे झालो तर आपल्याला ब्लॉक केलं जातं. पण आहे गैरसमज सुद्धा होऊ शकतात. एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी फोन करत असेल आणि तो नंबर आपल्याजवळ नसेल तर आपण तो उचलत नाही. Unknown नंबर म्हणून त्याला ब्लॉक करतो हे चुकीचे असू शकत. नंतर ती व्यक्ती भेटते, ” मी तुला काल फोन केला होता. तू उचलला नाहीस” मग कळतं अरेच्चा, हीने फोन केला होता की. अस असत.
पण ब्लॉक हा शब्द किती प्रसिद्ध झाला आहे. नाही आवडलं कर ब्लॉक, नाही पटलं, राग आला, नकोसं झाल कोणी कर ब्लॉक. ते पण एका टच वर. फक्त एक टच आणि झालं समोरचं माणूस ब्लॉक. संवाद तिथंच संपला. त्या व्यक्तीला काय वाटेल मन दुखावलं जाईल याचा विचार पण येत नाही. आपल्याला काय वाटेल आपण ब्लॉक झालो तर हा ही विचार येत नाही.
हे ही ठिक आहे कोणी विनाकारण जास्त त्रास देत असेल उदा. कस्टमर केअर, लोन, इ. तर त्यांना ब्लॉक केलं तर चालून जातं पण, कधी कधी आपल्या प्रेमाच्या माणसांनाही आपण गैरसमजातून ब्लॉक करतोच की. कधी कधी तर typing..असं दिसत असतानाही ब्लॉक केलं जातं. आपण तरी काय करणार..राग, दुःख, चिडचिड, गैरसमजूत सगळे एकत्र जमतात ना ब्लॉक कर त्याला किंवा तिला म्हणून सांगायला. प्रत्येकवेळी असंच नसतं बरं का. कोणाला कायमचं विसरण्यासाठी पण ब्लॉक केलं जातं. यात होतं काय माहीत आहे? ब्लॉक केलं तर मनातल्या आठवणी पण ब्लॉक केल्याच पाहिजेत त्या मनात सेव्ह करून कसं चालेल? मग ब्लॉक करूनही डिपी; बरोबर संवाद साधणं आलंच. जुन्या साठवलेल्या आठवणी मनात आणून रडणं. खरंतर त्याचा जास्त त्रास देतात. शक्य होईल आठवणी पुसणं? नाहीच होणार शक्य. याला उपाय एकच असावा कदाचित. जितका जास्त संवाद तितकं जास्त नातं घट्ट होतं जातं म्हणजेच मुरतं कैरीच्या लोणच्यासारखं. वा! किती छान वाटतं नात्यांना अशी उपमा दिली की. दवबिंदू आणि गवत. समुद्र आणि लाटा. अत्तराची कुपी आणि अत्तर.. सांगायचंय इतकंच की ब्लॉक करताना एकदा विचार करा..चार पाच वेळा तरी कराच कारण ब्लॉक झालं तर काय वाटतं? हे आपल्याला आपल्या अनुभवावरूनच माहीत असतं. मैत्री असो नाहीतर प्रेम, नात्यांची गम्मत संवादातच असते. ब्लॉक अनब्लॉक करणं निमित्त फक्त.

पल्लवी उधोजी

Leave a Reply