कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालय उद्भवलेल्या समस्येवरून पी. चिदंबरम यांची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली : १ मे – देशभरातील वीजसंकटाला केंद्र सरकारला जबाबदार धरून माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी कोळसापुरवठ्यासाठी रेल्वेच्या प्रवासी फेऱ्या रद्द करण्याचा अत्यंत योग्य उपाय सरकारला सापडल्याची उपरोधात्मक टीका केली. कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालय उद्भवलेल्या या समस्येसाठी दररोज नवी कारणे शोधत असल्याचा आरोपही केला.
चिदंबरम उपरोधाने म्हणाले, ‘पुरेसा कोळसा आहे. रेल्वेचे मोठे जाळे आहे. औष्णिक प्रकल्पांचा पूर्ण क्षमतेने वापरही होत नाही. तरीही, ऊर्जेचा तुटवडा आहे. मोदी सरकारवर आरोप करता येणार नाही. काँग्रेसचा साठ वर्षांच्या सत्ताकाळ त्यासाठी जबाबदार आहे! सरकारला या समस्येवर खूप छान तोडगा सापडला आहे. प्रवासी रेल्वे रद्द करा आणि कोळशाचे रेक सुरू करा. ‘मोदी है, मुमकीन है’.’ ‘या संकटातून आपण सावरत असल्याचे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी कोळसानिर्मिती आणि कोळशाची आयात वाढविली पाहिजे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकार पूर्ण तयार नाही,’ असे चिदंबरम म्हणाले.
दरम्यान, कोळशाचा अपुरा पुरवठा असेल, तर येत्या काळात महागाई वाढेल. जनता आणखी त्रस्त होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply