उद्धवजी तुमचे चुकलेच – माधव पाटील

कधी नव्हे एवढा शुक्रवार शनिवार व त्यानंतर आज तागायत राणा विरुद्ध सेना वाद उफाळून आला.आता या दोन सु संस्कृत,गावंढळ की अनपढ अट्टाहासी प्रवृत्तीना काय म्हणावे बरें कोण बरोबर कोण चूक याचा आज सर्वत्र काथ्थ्याकुट सुरु आहे एवढेच नव्हे तर या खलबती खणखणाटा ने सामान्य माणसाचे डोके किट्ट झाले आहे.त्यांना तर वीट यावा या अमंगळ घटनेने.आता तर हा वाद इतका विकोपाला गेला आहे की त्या राणा राणी दांपत्याला राजद्रोहाखाली अटक झाली.माफ करा मी आधीच ग्रामीण माणुस. आमच्या कडे एक म्हण आहे ती म्हणजे’× × × × × × अन कावळ्याला आमंत्रण. पथ्यावर पडलेली खासदारकी व आमदारकी हाच तो एकमेव स्वाभिमानी बाणा ना आगे ना पीछे हम एक दुजे के लिये अशा ह्या काहीशा धाडसी दाम्पत्या ने पाठीवर बाणांचा भाता घेत चालीसा उडी घेतली आणि अमरावती मुंबई रेल्वे रुळ ओलांडला तो थेट खार च्या आवारात. तिकडे हातवारे करत मुम्बाबाई महापौर गरजल्या,चालीसा जी काय बरळायची ती तर अ मरावती शिवारात.मुंबई आमच्या बा ची आहे इकडे याल तर खबरदार पण टीच्चून जोडपं मुम्बा पूरीत दाखल झालेच.नंतर सेनेचे तूणतुणे वाजले की पादले,येवुन तर पहा मातोश्रीच्या दारात.आता पुढे काय काय झाले ते उघड्या डोळ्यांनी तमाम जनतेने पाहिले ऐकले.
प्रिय अमुच्या महाराष्ट्र देशात तेही माहित आहेच ———सेनेच्या साक्षात पावन खिंडीत राणा दाम्पत्य खारबद्ध झाले.या सा-या धक्का धक्कीत, ‘पोलिसांना काय करायचे ते चांगले माहित आहे’ फेम राज्याचे गृहमंत्री वळसे घेत रात्री मुंबईत कामा च्या अती व्यस्ततेमुळे उशिरा पोचले की पोहोचवल्या गेले( ! )
मुख साहेब जाणोत.उप मुख मंत्रीहि हनुमान चालीसा कुणी कुठे म्हणावी यात दुमत नाही असे वारंवार म्हणत राणा दांपत्याला फटकारते झाले.एवढेच नव्हे तर दोन दिवस गोंधळ होवुनही राज्यात कायदा व सुरक्षा ठेवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे असे चलते बोलते झाले.यात केंद्रिय मंत्री नारायणरावांनी उडी घेत मार्मिक विचारणा केली की जर मुस्लिम बांधव रस्त्यावर नमाज पढू शकतात तर हिंदू बांधव मातोश्री दारी चाली सा म्हणणार असतील तर गैर ते काय? मातोश्री आमच्या ‘बा’ ची आहे हे मुम्बा बाई रागातच ठणकावत राहिल्या…….. राणा दाम्पत्य म्हणाले होते मुख मंत्री यांनी मातोश्री वर चालीसा म्हणावी अन्यथा आम्ही तेथे येवुं म्हणू. हा अट्टाहास त्यांचा चुकला असे क्षणभर मानू पण
मुखमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या वादात तेल न ओतता वा फोडणी न देता शांत डोक्याने व सामंजस्याने ते हाताळले असते तर ?…..पण ते इथेच चुकलेच. ते नेहमी गर्वाने सांगतात की आम्ही साक्षात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जिती जागती मर्द सेना आहोत.त्यांनी मोठ्या मनाने राणा दांपत्यास पाचारण व स्वागत करुन मातोश्रीवर हनुमान चाली सा म्हणू दिल्ली असती तर ते काही दरोडा टाकणार नव्हतेच. शिवाय शिव्या द्यायला वा आशिर्वाद द्यायला नवनीत राणा काही 92 (!) वर्षाची आज्जीही नव्हती किंवा चुकून हनुमान चालिसा संजय राऊताप्रमाणे मराठीत म्हणणारी ही नव्हती.उलट त्यांची उपरणे खणा नारळने ओटी भरली असती तर उद्धवजीची प्रतिष्ठा व उंची वाढली असती व सा-या आसमंतात उदो उदो झाला असता.मी आपली लंकापती रावनाशी तुलना करु इच्छित नही तथापि येथे आपला अहंकार नडला हे सांगावेसे वाटते
.आता साप गेल्यावर फरकांडी मारण्यात काय फायदा….रात गयी बात गयी. वेळीच शहाणपण सुचले असते तर…..आता तर तेल हि गेले तूप हि गेले.घ्या हाती धोपाटणे…

माधव पाटील

Leave a Reply