ज्यांचा चोंगा फाटलायं ते भोंग्यावर काय बोलू शकतात – वडेट्टीवारांची बोचरी टीका

चंद्रपूर : २५ एप्रिल – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना अटक झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राणा-राज प्रकरणात उडी घेतली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता चौफेर टिका केली. राज ठाकरे यांचे नाव वडेट्टीवारांनी घेतले नाही. मात्र, त्यांनी “ज्यांचा चोंगा फाटलायं ते भोंग्यावर काय बोलू शकतात” असा टोला हानला. राणा दाम्पत्यावर बोलताना , राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दाम्पत्यासाठी चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर त्यांनी केला. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे महत्व आम्हाला सांगू नये, अशी बोचरी टीका त्यांनी केली. वडेट्टीवारांचा वक्तव्यामुळे राज्याचं आदीच तापलेलं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply