पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा खून झाल्याची माहिती उघड

वर्धा : २१ एप्रिल – मागील पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे उघडकीस आली आहे. रितिका काखे असं या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पवनार येथील अल्पवयीन मुलगी ही शनिवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारी सेवाग्राम पोलिसांत तिच्या आईने दिली होती. तक्रारीची दखल घेत सेवाग्राम पोलिसांनी आपला तपास चालू करीत मुलीचा शोध घेतला. तपासा दरम्यान पोलिसांनी 30 वर्षीय सतीश जोगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसी हिस्का दाखवल्यावर त्याने पाच तासांनी आपला गुन्हा कबुल केला.
आरोपी सतीश जोगे याने रितिकाचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी सतीशने रितीकाचा सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दुपट्ट्याने गळा आवरुन खून केला आणि मृतदेह नदीलगतच्या बेसरमच्या झाडाजवळ गड्डा करुन पुरला होता. आरोपीने घटनास्थळाची माहिती सेवाग्राम पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला.
मृतदेह विवस्त्र आणि कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सेवाग्राम पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply