हातावर हात ठेवून बसाल तर ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनासुद्धा नकाब आणि हिजाब घालावा लागेल – डॉ. अनिल बोंडे

अमरावती : २१ मार्च – फक्त स्वाभिमान बाळगून चालणार नाही. आम्ही भारतीय आहोत भारत मातेचे पुत्र आहोत असं म्हणून हातावर हात ठेवून बसाल तर इतर देशाप्रमाणे ३० वर्षानंतर तुमच्या मुलींनासुद्धा नकाब आणि हिजाब घालावा लागेल असं वादग्रस्त वक्यव्य भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केलं आहे.
पुढच्या ३० वर्षात आपल्याही मुलींवर हिजाब घालण्याची वेळ आली तर नवल वाटणार नाही असं खळबळजनक वक्तव्य माजी कृषिमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं आहे. खरंतर, आधीच राज्यात हिजाबवरून वातावरण तापलं असताना आता अनिल बोंडे यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

वरुड तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. नुकताच हिजाब प्रकरणावरून न्यायालयाने निकाल दिला. त्याच्या पार्श्वभूमिवर मुंडे यांनी केलेले हे विधान अनेकांच्या भुवया उंचावणारं आहे. याच कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला, तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली. नाहीतर अयोध्या, मथुरा व काशी विश्वनाथ इथं चित्र वेगळे आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मोठ्या ताकतीने करावा.’ असंही अनिल बोंडे म्हणाले.

Leave a Reply