सामान्यांचे काम करत नाही मात्र दलाली खाण्यात हे सरकार गुंतले – फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद : २१ फेब्रुवारी – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार सामन्याचे काम करत नाही मात्र दलाली खाण्यात हे सरकार गुंतले, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सरकारला काम नाही. नको त्या विषयावर सकाळी सकाळी पोपट पंची करायची मात्र शेतकऱ्यांकडे जनतेकडे वेळ द्यायला वेळ नाही. सरकार सामन्याचे काम करीत नाही मात्र दलाली खाण्यात हे सरकार गुंतले आहेत, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी सरकावर केली आहे.
तसंच रोज काय होतेय हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. त्यांची निराशा या सूडाच्या राजकारणातून बाहेर येतं आहे, असंही ते म्हणालेत.
सुडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे. आमचे हिंदुत्व हे सुडाचे राजकारण करणे नाही. त्यात देशाचे काय होईल. याचा विचार कुणी तरी करायला हवा होता. तो आम्ही करत आहोत. बदला घेणारे आमचे राजकारण नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. काल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला.

Leave a Reply