वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

औरंग्याचे वंशज !

फक्त शिवसेना नावाचा पक्ष सत्तेवर बसून राज्यात शिवशाही येत नसते !
त्यासाठी राज्यकर्त्यांच्या हृदयात शिवरायांना स्थान असावे लागते !
आज उधोजींच्या ऐवजी शिवराय जर गादीवर असते ,
तर , एसटी चे कर्मचारी काय आत्महत्या करून मेले असते !
एकदा हे साहेब गरजले होते दुसऱ्या बाजीरावाच्या थाटात ! कि ,
आम्ही गादीवर आलो तर कोणाला संप आंदोलनाचं कामच नाही पडणार!
त्यांच्या सर्व समस्या आम्ही चुटकीसरशी सोडवणार !
आणि आज मात्र तेच आपल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करत आहेत !
त्यांच्याशी साता जन्माचे वैरी असल्यागत वागत आहेत !
आज शिवाजी राजे सत्तेवर असते तर
काय ते असेच वागले असते ?
कर्मचार्यांशी उद्दामपणे वागणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी टकमक टोक दाखवले असते !
कुठे रयतेला लेकराप्रमाणे वागवणारे
शिवराय !
आणि कुठे हे आपल्याच कर्मचाऱ्यांना
हाल हाल करुन मारणारे शिवराळ !
स्वतःला जरी ते शिवसैनिक म्हणवून घेत असतात !
तरी शिवरायांपेक्षा ते त्या औरंग्याचेच वंशज शोभतात !

      कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply