विद्युत तारेचा धक्का लागून आजी आजोबांसह नातवाचा मृत्यू

यवतमाळ : ७ नोव्हेंबर – पिकाला पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या आजी, आजोबा व नातवाला शेतात टाकलेल्या विद्युत तारेचा धक्का बसल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दारव्हा तालुक्यातील डोल्हारी (शेंद्री) येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मारोती चंद्रभान सुरदसे (७०), मणकर्णा मारोती सुरदसे (४५), नातू सुमित विनोद सुरदसे (१७) अशी विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यासंदर्भात डोल्हारी येथील पोलीस पाटलांनी घटनेची प्राथमिक माहिती दारव्हा पोलीस व महसूल प्रशासनाला दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवाशीच एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply