वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

एकच उल्लू पुरे !

गालिब म्हणतो एकच उल्लू पुरे बगीचा उजडाया !
तसा पुरेसा होता पप्पू काँग्रेस नौका डुबवाया !

दोन माकडे आली पक्षी आता त्याच्या मदतीला !
वेळ कितीसा लागे आता संपवायला डंगरीला !

पप्पू हाती हिरा लागला होता मोठ्या नशिबाने !
दगड समजुनी दिले फेकुनी त्याला वेड्या दगडाने !

धैर्यशील त्या कप्तानाला उगा डिवचले माठाने !
आपुल्या हस्ते अपुल्या पायी कुर्हाड मारिली पप्याने !

आणि निवडला एक मस्कर्या सोडून सैनिक सच्च्या !
तोच तुला रे भिकेस लाविल समजुन घे रे बच्चा !

पक्ष विसर्जन मसुदा देवुन गेले देवाघरी !
त्या बापूंची अंतिम इच्छा करेल पप्पू पुरी !

          कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply