सुरत : २९ सप्टेंबर – आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारपासून दोन दिवसांच्या सुरत दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरत युनिटच्या सूत्रांनी सांगितले की, हा एक अराजकीय दौरा होता. भागवत उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि बुद्धिजीवींसह विविध लोकांना सुरत आरएसएस मुख्यालयात भेटले. नंतर संध्याकाळी त्यांनी शहरातील विज्ञान केंद्रात हिंदुत्वावर विचारवंतांच्या मेळाव्याला संबोधित केले.
“हिंदुत्वाचे तीन अर्थ आहेत – दर्शनिक, लौकिक आणि राष्ट्रियता (तत्वज्ञान, सांसारिक आणि राष्ट्रीय). सिंधू नदीच्या दक्षिणेला राहणारे हिंदू म्हणून ओळखले जातात, ” असंही ते म्हणाले.
एक समान संस्कृती असलेला समाज हा एक राष्ट्र आहे, असे आवाहन करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे. “हिंदुत्व म्हणजे जे सर्व लोकांसोबत एकजूटपणे चालतात,” ते पुढे म्हणाले.
डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, प्राध्यापक, शिक्षक, वकील आणि विचारवंत यांच्यासह समाजातील विविध घटकांतील १५० हून अधिक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. “सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे.” असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. तसेच जमावातून एखाद्याची हत्या करणारे लोक हिंदुत्व विरोधी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.