नागपूर : २२ सप्टेंबर – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावच्या बिसेन परिवारातील चौघांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचा तपास वेगाने करून या प्रकरणातील आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस विभागाने स्वस्थ बसू नये, झालेला प्रकार केवळ गोंदिया जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निंदाजनक व चीड आणणारा आहे,असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी म्हंटले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही ,राज्यात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, राज्यातील सत्ता पक्ष असो वा प्रमुख विरोधी पक्ष असो एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहे मात्र मुख्य विषय बाजूला पडत आहे, धाक नावाचा प्रकार उरलाच नसून सूडबुद्धीने प्रेरित राजकारण्यांना वाढत्या गुन्हेगारी या विषयाकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे, त्यामुळेच चुरडी सारखी घटना असो वा महिलांवरचे अत्याचार याच सोयरसुतक राहिलेले नाही, यापुढे जागरूक जनतेनेच अश्या नादान राजकारण्यांच्या व भष्ट अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावणे सुरू केले पाहिजे त्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, चुरडी प्रकरणाचा वेगाने तपास करून संबंधित सर्व आरोपींना पकडून जलदगती न्यायालयात खटला दाखल करून आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत गृहविभागाने मोकळा श्वास घेऊ नये असेही हेमंत गडकरी यांनी म्हंटले आहे.
चुरडी प्रकरणातील आरोपींना त्वरित पकडून फासावर लटकवा : हेमंत गडकरी
- Post author:Panchnama
- Post published:September 22, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments