गणपती विसर्जनादरम्यान ५ जण गेले वाहून, एकाचा मृत्यू

चंद्रपूर : २१ सप्टेंबर – नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली. बोकारे प्लाट रामनगरचे पाच जण रात्री गणपती विसर्जनावेळी ईरई नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना काल (२० सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास दाताळा मार्गावर घडली. नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाच जण यात वाहून गेले. यात चार जणांना मोठ्या जिकरीने वाचविण्यात आले. मात्र एक जण यात वाहून गेला. प्रवीण उर्फ गोलू वनकर असे या युवकाचे नाव आहे. कालपासून शोधकार्य सुरू होते. आज त्याचा मृतदेह आढळून आला.

Leave a Reply