विदर्भात पुढील दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता, नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नागपूर : २० सप्टेंबर – विदर्भवासि आणि नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणं किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका, असं आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील धरणे बऱ्यापैकी भरलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने पुढील २ दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस आणि आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवक्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता, दरवाजे असणाऱ्या मोठ्या धरणाचे वक्र दरवाजे कधीही उघडण्यात येवू शकतात. तर दरवाडे नसणाऱ्या धरणातील पाणीसाठा 100 टक्के पेक्षा जास्त झाल्यावर नदी/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार आहे. त्यामुळे करीता नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसंच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना आणि नदी पात्रातून आवागमण करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply