निर्बंध शिथिल करण्याबाबत या आठवड्यात निर्णय – आदित्य ठाकरे

मुंबई : २ ऑगस्ट – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यात अजूनही निर्बंध लागू आहेत. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये निर्बंधं अद्यापही पूर्णपणे शिथिल करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र निर्बंधांवर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काही ठिकाणी जिथे रुग्ण वाढताहेत तिथे काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी डिसेंबर-जानेवारी महिन्यात जितके रुग्ण कमी झाले होते, तितके कमी झालेले नाहीत. पुढच्या काही दिवसात आपल्याला निर्बंध शिथिल होताना दिसतील. हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. काही जम्बो सेंटर आणि रुग्णालयं रिकामी आहेत, याचा अर्थ आपल्याला ती भरायची आहेत असा होत नाही. या आठवड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply