पटोले यांनी चव्हाट्यावर बोलू नये-शिवसेना नेते अरविंद सावंत

मुंबई:१3 जुलै- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पटोले यांना काही बोलायचे असेल, तर खाजगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा संताप शिवसेना नेते अरविंद सावंत व्यक्त केला आहे.
नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे आपण काय बोलतोय् याचे भान त्यांना राहिले पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचे आहे, ते त्यांनी खाजगीत बोलावे. चव्हाट्यावर बोलू नये, असे सावंत यांनी सांगितले. तुम्हाला काही अडचण असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा, पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांना कसे थांबवायचे, याचा निर्णय आता त्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री घेतील, असेही सावंत म्हणाले.

Leave a Reply