हिंगणघाटच्या मोहता गिरणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढा – आ . समीर कुणावार यांची मागणी

वर्धा : २५ जून- हिंगणघाटच्या मोहता गिरणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावा आणि बंद गिरणी ताबडतोब सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे दालनात आयोजित बैठकीदरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी केली. कोरोनाकाळात संचारबंदीचे कारण देत गिरणी व्यवस्थापणाने टाळेबंदी जाहीर करीत कामगारांना वाऱ्यावर सोडले असून, त्यांचे कुटुंबियांचा उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम कामगारांचे थकित वेतन व इतर देणी देण्याची मागणी करण्यात आली. येथे तोडगा न निघाल्यास हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित गिरणी कामगारांना दिले.
बैठकीमधे आमदार कुणावार यांचेसह, इंटकचे पदाधिकारी आफताब खान, गिरणी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी सिंग, प्रदीप हरणे तर शासनाच्या कामगार विभागातर्फे कामगार अधिकारी भगत, पानबुडे तसेच महावितरणचे उपव्यवस्थापक,कामगार राज्य विमा योजनेचे अधिकारी हजर होते.

Leave a Reply