अमरावती : ६ मे – वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी जमानतीसाठी केलेला अर्ज अचलपूर न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा कारागृहातला मुक्काम वाढला आहे. श्रीनिवास रेड्डी यांना धारणी पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यानंतर रेड्डी यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर रेड्डी यांनी जामिनासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पोलिसांनी आपले म्हणणे मांडले. तसेच सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने रेड्डी यांचा जमानत अर्ज फेटाळून लावला.
श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला
- Post author:Panchnama
- Post published:May 6, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments