उधारीच्या पैश्याच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

नागपूर : २४ एप्रिल -साडेचार हजार रुपयांच्या उधारीवरून झालेल्या भांडणामुळे मित्राने मित्राची दगडाने ठेचून हत्या केली. दोघांनाही गांजा आणि दारूचे व्यसन होते. नशेच्या अंमलातच आरोपीने स्वत:च्या मित्राची हत्या केल्याची घटना सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास जरीपटका हद्दीत आर्य नगर येथे घडली. शुभम ऊर्फ कचरा राजेश मासूरकर (२६) रा. इंदोरा मायानगर, असे मृताचे तर रोहित मून असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुभम आणि रोहित हे दोघे चांगले मित्र होते. दोघांनाही दारू आणि गांज्याचे भारी व्यसन होते. शुभम हा सट्टय़ाच्या दुकानात काम करायचा. तर तो पोलिस खबर्‍या असल्याचाही काही लोकांना संशय होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे नशेची तलप आल्याने रोहित आणि शुभम एकाच गाडीवर बसूल जरीपटका हद्दीत प्लॉट क्र. ९६, आर्य नगर येथील वॉल कंपाउंड जवळ असलेल्या रिकाम्या जागी गांजा पित बसले होते. दरम्यान, त्यांच्यात साडेचार हजार रुपयांच्या उधारीवरून भांडण सुरू झाले. शुभमने रागाच्या भरता शुभमला मारण्यासाठी विट उचलली. त्यामुळे त्याला प्रतिकार करण्यासाठी शुभमने त्याला सिमेंटचा दगड (गट्टू) फेकून मारला. त्याने खाली पडलेल्या शुभमला दगडाने ठेचून ठार केले आणि तेथून पळ काढला. बराच वेळ झाला तरी शुभम घरी परत न आल्याने त्याच्या घरचे त्याला शोधायला निघाले. तो आर्यनगर येथे मृतावस्थेत पडलेला त्यांना दिसताच त्यांनी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिसांना याबाबत सूचना दिली. आरोपी शुभम याला त्याच्या घरून अटक करण्यात आली.

Leave a Reply