नॉटी जमात प्राण वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांच्या जीवावर उठली आहे – अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई : २० एप्रिल – रेमडेसीवीर इंजेक्शन साठा पुरवठ्यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता या वादात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. ‘नॉटी जमात प्राण वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांच्या जीवावर उठली आहे, अशी टीका केली आहे.
वांगणी रेल्वे स्थानकावर पॉइंटमन मयूर शेळके याने एका अंध महिलेच्या मुलाचा जीव वाचवला. हा व्हिडीओ शेअर करता अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘एक माणूस आपल्या जीवाची बाजी लावून एका मुलाचा जीव वाचवत आहे. तर दुसरीकडे नॉटी जमा ही जी लोकं इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचं खरं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
याआधी अमृता फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. आताही रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवठा प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

Leave a Reply